भामरागड येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राकॉ मध्ये प्रवेश !!



भाग्यश्री ताई आत्राम यांनी दुपट्टा देत केले स्वागत व मार्गदर्शन !!

भामरागड:-कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम तसेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भामरागड तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी २८ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केले.

भामरागड तालुका हा अतिदुर्गम व
आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखला जातो.या तालुक्यातील दुर्गम भागात फारसा राजकीय नेते मंडळींचा संपर्क नसतो.मात्र,मंत्री धर्मराव बाबा आत्राम तसेच भाग्यश्री ताई आत्राम यांचा तालुक्यातील विविध गावात वाढता संपर्क आणि विकास कामामुळे तालुक्यातील विविध गावांतील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.भाग्यश्री ताईंनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत सर्वांचे स्वागत केले.

यात नगर पंचायत हद्दीतील मेडपल्ली,भामरागड टोला,हिनभट्टी तसेच राणीपोडुर,धोडराज आदी गावातील कार्यकर्त्यांचा मोठ्याप्रमाणात समावेश होता.भाग्यश्री ताई आत्राम यांनी स्वागत करून पक्ष संघटन वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले.यावेळी भामरागड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments